बारावीचा निकाल चेक करा ऑनलाईन! -१३ लाख विद्यार्थी झाले उत्तीर्ण!! या लिंक वरून डाउनलोड करा पूर्ण मार्कलिस्ट!
MH HSC Result MarksList Download 2025
MH HSC Result MarksList Download 2025 – महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ इतकी आहे. तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ इतकी आहे. दरम्यान आजच्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोणक विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागला आहे. तर यामध्ये सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के इतका लागला आहे.
खाली दिलेली निकालाची लिंक बघावी त्या वरून आपण निकाल पहावा. बारावीच्या बहुप्रतीक्षित निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हि एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज म्हणजेच ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/१२वी) चा निकाल जाहीर करेल. निकाल पत्रकार परिषदेत जाहीर केला जाईल लगेच खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर निकालाची थेट लिंक सक्रिय केली जाईल. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे लग्नापूर्वीचे नाव प्रविष्ट करावे लागेल. आम्ही निकाल ज्या वेबसाईट वर जाहीर होणार आहे त्या सर्व लिंक खाली देत आहोत.
तसेच मित्रांनो, महत्वाचे म्हणजे मागील वर्षीपासून महाराष्ट्र बोर्ड निकालासोबत टॉपर्सची यादी जाहीर करत नाही. यावर्षीही टॉपर्सची नावे बोर्डाकडून जाहीर केली जाणार नाहीत. निकाल विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक प्रवाह, आयटीआय या प्रवर्गानुसार जाहीर केला जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी.
कसा चेक कराल आपला निकाल?
महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल २०२५ जाहीर होताच, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम खाली दिलेल्या कोणत्याही वेबसाइटला भेट द्यावी आणि साइटच्या होम पेजवरील निकालाचे पेज ओपन होईल. यानंतर, तुम्हाला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकावे लागेल आणि “व्ह्यू रिझल्ट” बटणावर क्लिक करावे लागेल. आता तुमचा निकाल स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि प्रिंटआउट घेऊ शकता.
HSC Result 2025 On Mobile LINK – जर आपण मोबाईल वर आपला ऑनलाईन निकाल बघणार असलात तर विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यापैकी कोणत्याही साइटचा वापर करून निकाल तपासू शकतील-
पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत?
मित्रांनो, महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात आणि एकूण ३५% गुण आवश्यक असतील. अशा परिस्थितीत, जर एखाद्या विद्यार्थ्याला एक किंवा दोन विषयांमध्ये यापेक्षा कमी गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्याला विभागीय दर्जाचे मानले जाईल. त्याच वेळी, जर तुम्हाला दोनपेक्षा जास्त विषयांमध्ये ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले तर तुम्हाला अनुत्तीर्ण मानले जाईल. म्हणजे तुम्हाला पुन्हा त्याच वर्गात अभ्यास करावा लागेल. तसेच या वर्षी झालेल्या परीक्षेतएकूण १५ लाख मुले म्हणजे दहावी आणि बारावी दोन्ही वर्गात होती, ज्यामध्ये सुमारे ८ लाख मुले आणि सुमारे ७ लाख मुली होत्या. आता निकाल टक्का किती हे थंड्या वेळातच माहिती पडेल.
12 th HSC board